खूप छान कथा सर्वांनी वेळ काढून नक्की वाचा.....
अण्णाभाऊ साहित्य चिंतन
---------------------------------------------------
- कथा :- उपकाराची फेड
-------------------------------------------------------
शंकर चाम्भाराचे घर .
सकाळचा प्रहर .
आठ ते नऊ वाजण्याचा सुमार .
शंकरच्या घरी मनु परीट आलेला .त्याच्या पायातले खेटर तुटले होते अन दुरुस्ती साठी तो शंकर कडे आलेला .मनु हा शंकरचा मित्र .
शंकर त्याचे खेटर उलटे पालटे करून शिवुन देत होता .
शेजारी लाकडाच्या ओंडक्यांवर लखु मांग ताटकळत बसला होता .त्याचीही चप्पल तुटली होती .अन ती हातात घेवुन शंकरचे काम सम्पन्याची वाट पहात होता .
मनु परटाचा गावात दरारा होता. त्याच्या शब्दाला मोल होते .बेचाळीसपासून पुढारी म्हणून तो मिरवत होता .अन असा दरारेबाज मित्र आपनास लाभला म्हणून शंकर भलताच चढला होता .
शंकरचे काम चालू होते अन घरात चहा शिजत होता .
शंकर हातांनी खेटर नीट करत करत तोंडाने बोलत होता .बोलण्यात त्याची बरोबरी करणारा माणूस गावात नव्हता वर्षात चारसहा महीने मुम्बईत राहून हा चाम्भार भलताच ' शाणा ' म्हणून गावात ख्याती पावला होता तो दिल्लीपासून चामड्याच्या बाजारापर्यंत सर्व विषयावर बोलत होता .
विनोद करीत होता.हसत होता नी परीट व मांग याना हसवीत होता .
इतक्यात मळू महार पायाच्या अन्गठ्यात पायताण धरून ओढित तिथे आला .
- (त्यांच्यातील संवाद ) -
शंकर :- का ? घोडं मरगळीला आलं ?
मळू :- हो ,अंगठा तुटला गा !
* मळूने बैठक मारली .
दुरुस्त केलेले परटाचे खेटर शंकरने त्याच्याकडे ' धर घे ' म्हणून सरकावले .
आणि सळ आणि आरी त्याने मळूकडे फेकली .
शंकर :-- हं , घ्या हो हे सामान नी करा नीट पायतानं .
सळ नी आरी घेवून मळू आपलं पायतान सांधु लागला .
लखु मांग :- मला बी दे गा ! पना उपसलाय माझ्या चपलिचा .
शंकर :- वाईच कड काढ ,माझ्यापाशी आरी हाय एक अन मागता दोघं .कशी बरं देवू ? आळीपाळीनं घ्या ; न्हायतर मम्हईच्या भांडणावानी हातंच भांडण लागंल हो .
* असे म्हणून शंकर मोठयाने हसला .
मांगा महाराच्या खेटराला हात लावू नये हा रिवाज तोही काटेकोरपणे पाळत होता .
म्हणून कुठे आरी टोचावी ,कसा सळ ओढावा हे मळूला दुरुनच सांगु लागला .
मळू पुढे पाहून आपले काम करीत होता .
तो कोणाशी बोलत नव्हता .
शंकरला गप बसवले नाही .त्याने खाजवून खरूज काढलीच .
शंकर :- (मनुला ) महाराचंबी घसारलं बरं
मळू :- ते रं कसं ?
शंकर :- त्येनी समितिला मत देवून कॉँग्रेसला पाडलं .
( महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्रासाठी जेंव्हा रान पेटले होते , त्या वेळी तमाम जनता समितिच्या बाजूने एकवटली होती .आणि या मुद्द्यावर निवडणुका होवून संयुक्त महाराष्ट्र समितीला घवघवीत यश मिळाले होते असा इतिहास आहे . )
मळू :- एक बोलु ?
शंकर :-हो हो बोल की -
मळू :- चाम्भारला टाक्यागणिक बुद असती अशी एक म्हण हाय .पण तुला एकबी न्हाय ----
शंकर :- माझ्या टकुर्यात न्हाय आलं !
मळू :- आरं , कॉँग्रेस पडली ह्यात तुझ्या बाचं काय गेलं ?
शंकर :-- तसं नव्हं ,आपुन गरीब चिलटानं हत्तीवर गाडया खेळनं बरं न्हाय -
मळू :- आरं, मग तो हत्ती पडला रं कसा ? बोल ?
* मळूच्या या चिडक्या बोलानं शंकरचा चेहरा खरकन उतरला .तो पेकाट खाजवु लागला .बोलण्यात ख्याती पावलेला शंकर भुईसपाट झाला .
मनु परिट आणि लखु मांग गम्भीर होऊन शंकरकडे पाहू लागले .
एवढयात चहा तयार झाला .शंकर घरात गेला आणि स्वतः चहा पिऊन बाहेर आला त्यानं देवळीत ठेवलेल्या खास कपात लखुला चहा दिला आणि -
शंकर :- मळूनाना ,वाईच चहा घेणार का ?
मळू :-मी चाम्भाराचा चहा पीत न्हाय .
* मळूने हातातली आरी शंकरकडे परत फेकून दिली .मळूच्या बोलानं शंकर चिडला.
शंकर :- मानानं पान खावे असा वाडवडलांचा बोल हाय मळूनाना !
मळू :- पण शेरडावाणी पाला खाऊ नये हा माझा बोल हाय शंकरभाऊ !
शंकर :- म्हंजी काय ?
मळू :-म्हंजी वासरात लंगडी गाय ---
शंकर :- असा तिड्यात का बोलतोस ?
मळू :- माझं बोलणं सरळ हाय .
तू माझा चहा पिणार का ?
शंकर :- त्ये कसं बरं ? जमेना ,तू महार नि मी चाम्भार ----
मळू :- मग आमीच तुझा चहा का
प्यायचा ?
शंकर :- सार्यानी आपापल्या पायरीनं वागावे .
मळू :- तुझी कंची पायरी ? चल नाव घी .
शंकर :- तू आमची बरोबरी करू नगं .तुमी ढोरं ओढता ,कातडी काढता ....
मळू :- आनि ती कातडी चिलबिलून तू संसार करतोस नि वर बेम्बिला थुंका लावून बामन ....
शंकर :- आरं ,मग आम्ही म्हाराचं खावे का काय ? आरं ,अठरा पगड जात देवानं केलीया ,आणि आम्ही तुम्हास्नी सळ नि आरी देतो त्याचे उपकार माना , इसरू नगा..
मळू :- न्हाय इसरत , तुझा सळ नि आरीचा उपकार फेडुनच मी मरेन .
* असे म्हणून मळू वाटेला लागला .
शंकर त्याच्याकडे पहात राहिला .
परीट नि लखु मांग यानी शंकरकडे पाहिलं.
शंकर लाजला .दुःखी झाला .तो परटाकडे वळून हळुच म्हणाला की ,
" म्हारानं माझा अपमान केला "
त्या दिवसापासून शंकर आणि मळू एकमेकास बोलत नव्हते .त्यांच्या मनात शब्दांच्या जखमा चिघळत होत्या .
' सळ नि आरी देतो हे उपकार मान ' हा शंकर चाम्भाराचा बोल मळूच्या काळजात रूतून बसला होता तर
' कातडी चिलबिलून संसार करतोस नि वर बेम्बीला थुंका लावून बामन ' ही मळू म्हाराची डिरकी शंकरच्या वर्मी लागली होती .
पुढे सुगी आली नि गेली .
पावसाळा आला . जनावराना हिरवा चारा मिळू लागला .पण या चार्यासोबत
गावात जनावरांचा रोगही शिरला .
शंकरची म्हैस दगावली .
तो धावतच मळूकडे आला .
शंकर :- मळूनाना, माझी म्हैस मेलीय चल. मळू :- चल कुठं ? मी येवून तुझ्या म्हशीला काय जिती करणार हाय ?
शंकर :-तसं नव्हं --आता बघ .. चल की .
मळू :-त्या मेल्या म्हशीला बघुन मला काय मिळणार ?
* मळूच्या बोलण्याचा रोख कळताच शंकरने मनु परटाचे घर गाठले नि मग दोघांनी गाव उठवले .
" म्हारं चढली लेका -चला , म्हारास्नी आता गाव दिसेना , आरं चला की म्हारुडा द्या फुंकुन " असे म्हणून मनु परटाने अग्ग्या मोहोळ उठवले .गाव बिथरला. परटाच्या आळीतील पोरं हातात घावेल ते घेवून म्हारवाड्याकडे धावत सुटली .
गुरवाने शिंग फुंकले अक्खा गाव बेफाम सुटला .चावडीत रंगू पाटलाला खबर मिळाली .तोही धावत आला .
सगळ्यात पुढे मनु परीट आणि लोकांचा लोंढा बघुन मळू सामोरा झाला .
मळू :- तिथंच थाम्बा ,म्होरं येवू नका .
मनु :-जीव पाहिजे असेल तर मागं सर ...
मळू :--मला नगं जीव .कंटाळा आलाय त्येचा .पर काय भानगड हाय ?
मनु : -मी म्हारुडा पेटवनार हाय
मळू : -तू नगं पेटवू .मीच पेटवतो.पर काय झालं ते आधी सांग .
* इतक्यात रंगू पाटील पुढं झाला .
पाटील :- मळू, काय भानगड हाय कळु दे की --
मळू :-भानगड काय न्हाय .परीट म्हारुडा जाळाय आलाय .
पाटील :- का रं मन्या , काय झालं ?
मनु :- शंकर्याची म्हैस मेलिया नि म्हारं ती ओढित न्हायीत .असली म्हारंच नगं अमास्नी ...
पाटील :- ( बिथरून ) आरं कुणाची बी घरं कुनीबी जाळाय हातं काय मोगलाई हाय व्हय ?
मनु :- मला फासावर चढवा पण मी मागं हटनार न्हाय हो !
पाटील :- आरं तू सतरा वकत फासावर जा रं , पण त्या शंकर्याच्या मेलेल्या म्हशीपायी गाव ढानकाला देवू नगं .
मनु :- मग गावची मेलेली ढोरं कोण ओढणार ?
पाटील :-त्येची तुला का पंचायत ? तुझ्या गोठ्यात शेपूट न्हाय नि का वळवळ करतोस ?
शंकर :-माझी म्हैस म्हारं वढित का न्हायीती ? इचारा .पायताणाचा अंगठा तुटला की त्येस्नी चाम्भार दिसतो .एरवी दिसत न्हाय .
मळू :-का दिसत न्हाय ? दिसतो की.अंगठा तुटला की सळ आणि आरी देतोस .
शंकर :- हो , हो देतोच की -
मळू :-मग थाम्ब तर -
* मळू घरात गेला .
अरूसे व कावडनी घेवून आला .ती ढोरं ओढन्याची अवजारे त्याने शंकर पुढे ठेवली .
मळू :-- ( शंकरला ) एकदा सळ नि आरी देवून तू माझ्यावर उपकार केलास ,आता ही आरूसं आणि कावडनी देवून मी त्या उपकाराची फेड करतोय. ही घेवून जा आणि वढ आपली म्हैस .
शंकर :-आगा, मी ही कावढनी नि आरूसं घेवून काय करू याचं ?
मळू :-सळ नि आरी घेवून म्या जसं केलं तसं तू बी कर ,जमील जमील जा .
मळूचे ते बोलणे ऐकून सारा गाव हसला .
मळूच्या मनातले दुःख सर्वांना उमजले .
आणि आपल्या काळजातली ती जखम भरून आल्यासारखे मळूला वाटले .
मनु परीट मात्र पुरता खजील झाला .
- - कथा समाप्त - --
-------------------------------------------------------संदर्भ :-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ,
निवडक वाड:मय, पान 394
प्रकाशक :महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्क्रुति मंडळ ,द्वितीय अव्रुत्ती 2001
-------------------------------------------------------
- विश्लेषण -
1 :-ही कथा प्रथम युगांतर या साप्ताहीकात प्रकाशित झाली आहे .नंतर ती वर नमुद केल्या प्रमाणे निवडक वाड:मय मधे शासनाच्या साहित्य व संस्क्रुति मंडळाने सामाविष्ठ केली आहे .
2 :ही कथा अम्बेडकरी तत्वज्ञानाधारे लिहिली गेली आहे .
3 : या कथेत जातीय उतरंडीतील सामाजिक संघर्ष दाखवला आहे .
4: अस्प्रुश्यामधेसुद्धा ही उतरंड आहे .
त्याच मुळे बाबासाहेबांना अश्प्रुश्यामधे एकजीवीपणा साधण्यासाठी खूप प्रयास केलेत .
5 :- या कथेत मनु परिट हा परम्परेचा प्रतिनिधि , शंकर चाम्भार हा ही परम्परावादी पण अश्प्रुश्य , लखु मांग हा आत्मविस्म्रूत जगाचा प्रतिनिधि तर मळू महार हा आत्मजाग्रुत अश्प्रुश्य .
6 :- ' तुला आणि मला दोघालाही जर सवर्ण शिवुन घेत नाहीत तर आपल्या दोघात उच्य-नीचता का ? ' असा थेट आणि अप्रत्यक्ष सवाल मळूचा शंकरला आहे .
7:- लखु मांग तर या संघर्षापासून खूप दूर आहे .तो या चर्चेतसुद्धा नाही .
हा लखु शंकरने दिलेल्या खास कपातील चहा गुमान पितो .तिथेच मळू चिडतो पण ते तो बोलून दाखवत नाही .या मधून अण्णाभाऊनी खूप मौलिक असा संदेश दिला आहे .
8 :- या कथेतील घटनांचा मूक साक्षीदार लखु मांग आहे हे खरे आहे पण ही कथांच लखुला जागे करण्यासाठी अण्णांनी लिहिली आहे .अतिशय हळुवार पणे अण्णाभाऊनी त्याला हाताळले आहे .
9 :-मळूची जिगर लखुमधे निर्माण व्हावी व भरकटलेला शंकर चळवळीत मळूचा सहकारी व्हावा .लखुने सुद्धा त्यांना साथ द्यावी अशी अण्णाभाऊची तळमळ आहे .
10 :-अश्प्रुश म्हणून आपण सक्खे भाऊ आहोत .ही विषमतावादी व्यवस्था आपली खरी शत्रु आहे .हे नीटपणे या तिघांनीही समजून घेण्याची गरज आहे हा या कथेचा सारांश आहे .
या कथेत माजी अस्प्रुश्य जातीतली क्षितिजसमांतर (Horizontal) असमानता ( महार , मांग व चर्मकार ) हे सामाजिक सर्वहारा ,कारागीर जात (ओबीसी परीट ) हे आर्थिक सर्वहारा व या पासून परात्मिकरण न झालेला पाटिल ...यांच्यातले द्वंद्व समजून घ्यावे लागेल .
महार , मांग ,चांभार यांच्यातील अंर्तविरोध समजून घेताना ते ऐतिहासिक भौतिकवादाने त्यांच्या आदिबंधापर्यंत जावे लागेल आणि मग शत्रुभावी विरोधाला अवैमनस्यभावात बदलवून सामाजिक सर्वहारांचे संघठन बांधावे लागेल .
.. सदर कथेत अण्णाभाऊंनी दाखवलेली जातवैशिष्ट्ये ,प्रतिके फार काही सांगतात . जास्त बडबड करणारा ,किंवा चिलटांनी हत्तीवर गाड्या खेळणं बरं नाही असं सांगत सुरक्षित राहू इच्छिणारा म्हणून कॉंग्रेसची भलावण करणारा ,महाराला अलग कपात चहा देऊन मी कसा त्यांच्यापासून वेगळा आहे हे दाखवणारा शंकर चांभार ,
स्वाभिमानाने अपमान सहन न करणारा ,अपमान लक्षात ठेवणारा ,अन् गाव महारवाडा जाळायला आल्यावर त्यांना जागेवरच अडवून सळ आणि आरीच्या "उपकाराची परतफेड " कावड अन् आरूशाने करणारा मळू महार !!!
महार व चांभाराचे द्वंद्व आपल्यावर पण उलटू शकते हे न लक्षात घेत व्यव्हाराशी व्यव्हार करणारा , व शंकरने "खास" कपातून दिलेला चहा पिणारा अज्ञानी लखू मांग !!!!
हे सामाजिक सर्वहारा जरी नुसते घेतले तरी त्यांचे प्रबोधनातील क्रांतिकारकत्व दिसते .
मग पुढे सामाजिक सर्वहारांचे नेत्रुत्व करणारा फकिरा मांग व आर्थिक सर्वहारांचे नेत्रुत्व करणारा सत्तू भोसले हा मराठा कुणबी यांची जोडी क्रांतीदोस्तीचे प्रतिक म्हणून त्यांनी निवडले.
येणाऱ्या काळात अशाच आशयातून प्रेरणा घेत आपल्याला आंदोलन उभे करावे लागेल !!!!
अण्णाभाऊ साहित्य चिंतन
---------------------------------------------------
- कथा :- उपकाराची फेड
-------------------------------------------------------
शंकर चाम्भाराचे घर .
सकाळचा प्रहर .
आठ ते नऊ वाजण्याचा सुमार .
शंकरच्या घरी मनु परीट आलेला .त्याच्या पायातले खेटर तुटले होते अन दुरुस्ती साठी तो शंकर कडे आलेला .मनु हा शंकरचा मित्र .
शंकर त्याचे खेटर उलटे पालटे करून शिवुन देत होता .
शेजारी लाकडाच्या ओंडक्यांवर लखु मांग ताटकळत बसला होता .त्याचीही चप्पल तुटली होती .अन ती हातात घेवुन शंकरचे काम सम्पन्याची वाट पहात होता .
मनु परटाचा गावात दरारा होता. त्याच्या शब्दाला मोल होते .बेचाळीसपासून पुढारी म्हणून तो मिरवत होता .अन असा दरारेबाज मित्र आपनास लाभला म्हणून शंकर भलताच चढला होता .
शंकरचे काम चालू होते अन घरात चहा शिजत होता .
शंकर हातांनी खेटर नीट करत करत तोंडाने बोलत होता .बोलण्यात त्याची बरोबरी करणारा माणूस गावात नव्हता वर्षात चारसहा महीने मुम्बईत राहून हा चाम्भार भलताच ' शाणा ' म्हणून गावात ख्याती पावला होता तो दिल्लीपासून चामड्याच्या बाजारापर्यंत सर्व विषयावर बोलत होता .
विनोद करीत होता.हसत होता नी परीट व मांग याना हसवीत होता .
इतक्यात मळू महार पायाच्या अन्गठ्यात पायताण धरून ओढित तिथे आला .
- (त्यांच्यातील संवाद ) -
शंकर :- का ? घोडं मरगळीला आलं ?
मळू :- हो ,अंगठा तुटला गा !
* मळूने बैठक मारली .
दुरुस्त केलेले परटाचे खेटर शंकरने त्याच्याकडे ' धर घे ' म्हणून सरकावले .
आणि सळ आणि आरी त्याने मळूकडे फेकली .
शंकर :-- हं , घ्या हो हे सामान नी करा नीट पायतानं .
सळ नी आरी घेवून मळू आपलं पायतान सांधु लागला .
लखु मांग :- मला बी दे गा ! पना उपसलाय माझ्या चपलिचा .
शंकर :- वाईच कड काढ ,माझ्यापाशी आरी हाय एक अन मागता दोघं .कशी बरं देवू ? आळीपाळीनं घ्या ; न्हायतर मम्हईच्या भांडणावानी हातंच भांडण लागंल हो .
* असे म्हणून शंकर मोठयाने हसला .
मांगा महाराच्या खेटराला हात लावू नये हा रिवाज तोही काटेकोरपणे पाळत होता .
म्हणून कुठे आरी टोचावी ,कसा सळ ओढावा हे मळूला दुरुनच सांगु लागला .
मळू पुढे पाहून आपले काम करीत होता .
तो कोणाशी बोलत नव्हता .
शंकरला गप बसवले नाही .त्याने खाजवून खरूज काढलीच .
शंकर :- (मनुला ) महाराचंबी घसारलं बरं
मळू :- ते रं कसं ?
शंकर :- त्येनी समितिला मत देवून कॉँग्रेसला पाडलं .
( महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्रासाठी जेंव्हा रान पेटले होते , त्या वेळी तमाम जनता समितिच्या बाजूने एकवटली होती .आणि या मुद्द्यावर निवडणुका होवून संयुक्त महाराष्ट्र समितीला घवघवीत यश मिळाले होते असा इतिहास आहे . )
मळू :- एक बोलु ?
शंकर :-हो हो बोल की -
मळू :- चाम्भारला टाक्यागणिक बुद असती अशी एक म्हण हाय .पण तुला एकबी न्हाय ----
शंकर :- माझ्या टकुर्यात न्हाय आलं !
मळू :- आरं , कॉँग्रेस पडली ह्यात तुझ्या बाचं काय गेलं ?
शंकर :-- तसं नव्हं ,आपुन गरीब चिलटानं हत्तीवर गाडया खेळनं बरं न्हाय -
मळू :- आरं, मग तो हत्ती पडला रं कसा ? बोल ?
* मळूच्या या चिडक्या बोलानं शंकरचा चेहरा खरकन उतरला .तो पेकाट खाजवु लागला .बोलण्यात ख्याती पावलेला शंकर भुईसपाट झाला .
मनु परिट आणि लखु मांग गम्भीर होऊन शंकरकडे पाहू लागले .
एवढयात चहा तयार झाला .शंकर घरात गेला आणि स्वतः चहा पिऊन बाहेर आला त्यानं देवळीत ठेवलेल्या खास कपात लखुला चहा दिला आणि -
शंकर :- मळूनाना ,वाईच चहा घेणार का ?
मळू :-मी चाम्भाराचा चहा पीत न्हाय .
* मळूने हातातली आरी शंकरकडे परत फेकून दिली .मळूच्या बोलानं शंकर चिडला.
शंकर :- मानानं पान खावे असा वाडवडलांचा बोल हाय मळूनाना !
मळू :- पण शेरडावाणी पाला खाऊ नये हा माझा बोल हाय शंकरभाऊ !
शंकर :- म्हंजी काय ?
मळू :-म्हंजी वासरात लंगडी गाय ---
शंकर :- असा तिड्यात का बोलतोस ?
मळू :- माझं बोलणं सरळ हाय .
तू माझा चहा पिणार का ?
शंकर :- त्ये कसं बरं ? जमेना ,तू महार नि मी चाम्भार ----
मळू :- मग आमीच तुझा चहा का
प्यायचा ?
शंकर :- सार्यानी आपापल्या पायरीनं वागावे .
मळू :- तुझी कंची पायरी ? चल नाव घी .
शंकर :- तू आमची बरोबरी करू नगं .तुमी ढोरं ओढता ,कातडी काढता ....
मळू :- आनि ती कातडी चिलबिलून तू संसार करतोस नि वर बेम्बिला थुंका लावून बामन ....
शंकर :- आरं ,मग आम्ही म्हाराचं खावे का काय ? आरं ,अठरा पगड जात देवानं केलीया ,आणि आम्ही तुम्हास्नी सळ नि आरी देतो त्याचे उपकार माना , इसरू नगा..
मळू :- न्हाय इसरत , तुझा सळ नि आरीचा उपकार फेडुनच मी मरेन .
* असे म्हणून मळू वाटेला लागला .
शंकर त्याच्याकडे पहात राहिला .
परीट नि लखु मांग यानी शंकरकडे पाहिलं.
शंकर लाजला .दुःखी झाला .तो परटाकडे वळून हळुच म्हणाला की ,
" म्हारानं माझा अपमान केला "
त्या दिवसापासून शंकर आणि मळू एकमेकास बोलत नव्हते .त्यांच्या मनात शब्दांच्या जखमा चिघळत होत्या .
' सळ नि आरी देतो हे उपकार मान ' हा शंकर चाम्भाराचा बोल मळूच्या काळजात रूतून बसला होता तर
' कातडी चिलबिलून संसार करतोस नि वर बेम्बीला थुंका लावून बामन ' ही मळू म्हाराची डिरकी शंकरच्या वर्मी लागली होती .
पुढे सुगी आली नि गेली .
पावसाळा आला . जनावराना हिरवा चारा मिळू लागला .पण या चार्यासोबत
गावात जनावरांचा रोगही शिरला .
शंकरची म्हैस दगावली .
तो धावतच मळूकडे आला .
शंकर :- मळूनाना, माझी म्हैस मेलीय चल. मळू :- चल कुठं ? मी येवून तुझ्या म्हशीला काय जिती करणार हाय ?
शंकर :-तसं नव्हं --आता बघ .. चल की .
मळू :-त्या मेल्या म्हशीला बघुन मला काय मिळणार ?
* मळूच्या बोलण्याचा रोख कळताच शंकरने मनु परटाचे घर गाठले नि मग दोघांनी गाव उठवले .
" म्हारं चढली लेका -चला , म्हारास्नी आता गाव दिसेना , आरं चला की म्हारुडा द्या फुंकुन " असे म्हणून मनु परटाने अग्ग्या मोहोळ उठवले .गाव बिथरला. परटाच्या आळीतील पोरं हातात घावेल ते घेवून म्हारवाड्याकडे धावत सुटली .
गुरवाने शिंग फुंकले अक्खा गाव बेफाम सुटला .चावडीत रंगू पाटलाला खबर मिळाली .तोही धावत आला .
सगळ्यात पुढे मनु परीट आणि लोकांचा लोंढा बघुन मळू सामोरा झाला .
मळू :- तिथंच थाम्बा ,म्होरं येवू नका .
मनु :-जीव पाहिजे असेल तर मागं सर ...
मळू :--मला नगं जीव .कंटाळा आलाय त्येचा .पर काय भानगड हाय ?
मनु : -मी म्हारुडा पेटवनार हाय
मळू : -तू नगं पेटवू .मीच पेटवतो.पर काय झालं ते आधी सांग .
* इतक्यात रंगू पाटील पुढं झाला .
पाटील :- मळू, काय भानगड हाय कळु दे की --
मळू :-भानगड काय न्हाय .परीट म्हारुडा जाळाय आलाय .
पाटील :- का रं मन्या , काय झालं ?
मनु :- शंकर्याची म्हैस मेलिया नि म्हारं ती ओढित न्हायीत .असली म्हारंच नगं अमास्नी ...
पाटील :- ( बिथरून ) आरं कुणाची बी घरं कुनीबी जाळाय हातं काय मोगलाई हाय व्हय ?
मनु :- मला फासावर चढवा पण मी मागं हटनार न्हाय हो !
पाटील :- आरं तू सतरा वकत फासावर जा रं , पण त्या शंकर्याच्या मेलेल्या म्हशीपायी गाव ढानकाला देवू नगं .
मनु :- मग गावची मेलेली ढोरं कोण ओढणार ?
पाटील :-त्येची तुला का पंचायत ? तुझ्या गोठ्यात शेपूट न्हाय नि का वळवळ करतोस ?
शंकर :-माझी म्हैस म्हारं वढित का न्हायीती ? इचारा .पायताणाचा अंगठा तुटला की त्येस्नी चाम्भार दिसतो .एरवी दिसत न्हाय .
मळू :-का दिसत न्हाय ? दिसतो की.अंगठा तुटला की सळ आणि आरी देतोस .
शंकर :- हो , हो देतोच की -
मळू :-मग थाम्ब तर -
* मळू घरात गेला .
अरूसे व कावडनी घेवून आला .ती ढोरं ओढन्याची अवजारे त्याने शंकर पुढे ठेवली .
मळू :-- ( शंकरला ) एकदा सळ नि आरी देवून तू माझ्यावर उपकार केलास ,आता ही आरूसं आणि कावडनी देवून मी त्या उपकाराची फेड करतोय. ही घेवून जा आणि वढ आपली म्हैस .
शंकर :-आगा, मी ही कावढनी नि आरूसं घेवून काय करू याचं ?
मळू :-सळ नि आरी घेवून म्या जसं केलं तसं तू बी कर ,जमील जमील जा .
मळूचे ते बोलणे ऐकून सारा गाव हसला .
मळूच्या मनातले दुःख सर्वांना उमजले .
आणि आपल्या काळजातली ती जखम भरून आल्यासारखे मळूला वाटले .
मनु परीट मात्र पुरता खजील झाला .
- - कथा समाप्त - --
-------------------------------------------------------संदर्भ :-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ,
निवडक वाड:मय, पान 394
प्रकाशक :महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्क्रुति मंडळ ,द्वितीय अव्रुत्ती 2001
-------------------------------------------------------
- विश्लेषण -
1 :-ही कथा प्रथम युगांतर या साप्ताहीकात प्रकाशित झाली आहे .नंतर ती वर नमुद केल्या प्रमाणे निवडक वाड:मय मधे शासनाच्या साहित्य व संस्क्रुति मंडळाने सामाविष्ठ केली आहे .
2 :ही कथा अम्बेडकरी तत्वज्ञानाधारे लिहिली गेली आहे .
3 : या कथेत जातीय उतरंडीतील सामाजिक संघर्ष दाखवला आहे .
4: अस्प्रुश्यामधेसुद्धा ही उतरंड आहे .
त्याच मुळे बाबासाहेबांना अश्प्रुश्यामधे एकजीवीपणा साधण्यासाठी खूप प्रयास केलेत .
5 :- या कथेत मनु परिट हा परम्परेचा प्रतिनिधि , शंकर चाम्भार हा ही परम्परावादी पण अश्प्रुश्य , लखु मांग हा आत्मविस्म्रूत जगाचा प्रतिनिधि तर मळू महार हा आत्मजाग्रुत अश्प्रुश्य .
6 :- ' तुला आणि मला दोघालाही जर सवर्ण शिवुन घेत नाहीत तर आपल्या दोघात उच्य-नीचता का ? ' असा थेट आणि अप्रत्यक्ष सवाल मळूचा शंकरला आहे .
7:- लखु मांग तर या संघर्षापासून खूप दूर आहे .तो या चर्चेतसुद्धा नाही .
हा लखु शंकरने दिलेल्या खास कपातील चहा गुमान पितो .तिथेच मळू चिडतो पण ते तो बोलून दाखवत नाही .या मधून अण्णाभाऊनी खूप मौलिक असा संदेश दिला आहे .
8 :- या कथेतील घटनांचा मूक साक्षीदार लखु मांग आहे हे खरे आहे पण ही कथांच लखुला जागे करण्यासाठी अण्णांनी लिहिली आहे .अतिशय हळुवार पणे अण्णाभाऊनी त्याला हाताळले आहे .
9 :-मळूची जिगर लखुमधे निर्माण व्हावी व भरकटलेला शंकर चळवळीत मळूचा सहकारी व्हावा .लखुने सुद्धा त्यांना साथ द्यावी अशी अण्णाभाऊची तळमळ आहे .
10 :-अश्प्रुश म्हणून आपण सक्खे भाऊ आहोत .ही विषमतावादी व्यवस्था आपली खरी शत्रु आहे .हे नीटपणे या तिघांनीही समजून घेण्याची गरज आहे हा या कथेचा सारांश आहे .
या कथेत माजी अस्प्रुश्य जातीतली क्षितिजसमांतर (Horizontal) असमानता ( महार , मांग व चर्मकार ) हे सामाजिक सर्वहारा ,कारागीर जात (ओबीसी परीट ) हे आर्थिक सर्वहारा व या पासून परात्मिकरण न झालेला पाटिल ...यांच्यातले द्वंद्व समजून घ्यावे लागेल .
महार , मांग ,चांभार यांच्यातील अंर्तविरोध समजून घेताना ते ऐतिहासिक भौतिकवादाने त्यांच्या आदिबंधापर्यंत जावे लागेल आणि मग शत्रुभावी विरोधाला अवैमनस्यभावात बदलवून सामाजिक सर्वहारांचे संघठन बांधावे लागेल .
.. सदर कथेत अण्णाभाऊंनी दाखवलेली जातवैशिष्ट्ये ,प्रतिके फार काही सांगतात . जास्त बडबड करणारा ,किंवा चिलटांनी हत्तीवर गाड्या खेळणं बरं नाही असं सांगत सुरक्षित राहू इच्छिणारा म्हणून कॉंग्रेसची भलावण करणारा ,महाराला अलग कपात चहा देऊन मी कसा त्यांच्यापासून वेगळा आहे हे दाखवणारा शंकर चांभार ,
स्वाभिमानाने अपमान सहन न करणारा ,अपमान लक्षात ठेवणारा ,अन् गाव महारवाडा जाळायला आल्यावर त्यांना जागेवरच अडवून सळ आणि आरीच्या "उपकाराची परतफेड " कावड अन् आरूशाने करणारा मळू महार !!!
महार व चांभाराचे द्वंद्व आपल्यावर पण उलटू शकते हे न लक्षात घेत व्यव्हाराशी व्यव्हार करणारा , व शंकरने "खास" कपातून दिलेला चहा पिणारा अज्ञानी लखू मांग !!!!
हे सामाजिक सर्वहारा जरी नुसते घेतले तरी त्यांचे प्रबोधनातील क्रांतिकारकत्व दिसते .
मग पुढे सामाजिक सर्वहारांचे नेत्रुत्व करणारा फकिरा मांग व आर्थिक सर्वहारांचे नेत्रुत्व करणारा सत्तू भोसले हा मराठा कुणबी यांची जोडी क्रांतीदोस्तीचे प्रतिक म्हणून त्यांनी निवडले.
येणाऱ्या काळात अशाच आशयातून प्रेरणा घेत आपल्याला आंदोलन उभे करावे लागेल !!!!
सदर कथा व त्यावरील विश्लेषण दैनिक सकाळी,दैनिक पुजारी,दैनिक महाराष्ट्र टाइम्स मधून विशेष दिवसी प्रसिद्ध करावा.
ReplyDelete