मातंग समाजाच्या रास्त मागण्या -काही प्रश्न

मातंग समाजाच्या रास्त मागण्या -काही प्रश्न


मातंग समाजाच्या रास्त मागण्या -काही प्रश्न 

मांतग समाज अनुसुचित जातीचा एक घटक आहे.हा समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. त्याला अन्य राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाते. आंध्रप्रदेशात त्याला माला-मादगी तर गुजरात मध्ये मांगेल तर मध्यप्रदेशाच्या काही भागात बालई-बोसोर म्हणून ओळखल्या जाते. महाराष्ट्रात पाहिले तर अनुसुचित जाती मध्ये महार / बौद्ध  जात 35.65 % मातंग जाती 30.25% चांभार जाती 22 %इतकी लोकसंख्या आहे. यावरुन अंदाज येतो की ही जात महाराष्ट्रात दुसर्या क्रंमांकावर आहे.
ह्या समाजाच्या सामाजिक आर्थिक प्रगतीसाठी सदर मागण्यांचा पाठपुरावा करून समाजाला न्याय मिळून देण्याचा प्रयत्न आपल्या परीने करण्यात यावा हि नम्र विनंती.
   
मातंग समाजाच्या सामाजिक प्रगतीच्या  मागण्या


१]मुंबई येथे साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक बांधून मिळावे .
[संदर्भगोल्ड मोहर मिल-दादर या मिल मध्येच अण्णा भाऊ नी कामगार म्हणुन नोंद आहे.
२]संगम वाडी पुणे येथील अध्य क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे अन्तर राष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधुन ध्यावे .
३]मातंग समाजाला अनुसुचित जाती मध्ये अ ब क ड वर्ग वारी नुसार आरक्षण देण्यात यावे .
[संदर्भ-२०% मुले शाळेच्या पटावर नाहीत.६०% मुले चौथी अगोदर शाळा सोडतात१५% मुले ९-१० पर्येंत शिकतात ५% मुले हि पदवी पर्येंत शिकतात] *उत्पन्नाचे साघन नाही -स्वतःची जमीन नाहीत.उद्योग धंद्यासाठी जागा नाहीत. 
 ४]साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे-मुक्त विद्यापीठ सुरू करावे .
५]महाराष्ट्र हा वीरांचा देश आहे त्या करिता प्रत्येक जिल्ह्यात क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे सांस्कृतिक भवन बांधुन मिळावे .
६]भायखळा येथील-जिजामाता उद्यानातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे खुले नाट्य गृह जे बंद होते,ते बंदिस्त नाट्यगृह लवकर आधुनिक पद्धतीने बांधुन मिळावे . 
संदर्भ-bmc -८७१३/प्र.क्र.९६७/२१[राज्य मंत्री -मा उदय सामंत]-मुंबई संस्कृती वारसा जतन समिती -निर्णय मान्यता -दि.१६-०५/२०१३
७]साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांचे विस्तृत साहित्य प्रकाशित करावे .
८]केंद्रीय स्तरावर आध्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून १००० कोटीची तरतूद करण्यात यावी .
९]साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न्न पुरस्कार देण्यात यावा .
१०]मातंग समाजातील बेरोजगार यांना योग्य प्रशिक्षण देऊन -रोजगार उपलब्ध करून तसेच शाशनाची व महानगर पालिके अतंर्गत होणारी कामे बेरोजगारांना देण्यात यावी. 
 संदर्भ-महिला बचत गट /सहकारी सोसायटी
११]समाजातील महिला ज्या ग्रामीण भागात -दाई /आया म्हणून बाळंत पणाचे काम करतात त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन मानधन देण्यात यावे.तसेच रूग्णालया मध्ये नोकरीत प्राधान्य देण्यात यावे .
१२]समाजातील बेरोजगार तरुणाला उदर निर्वाह साधन म्हणुन मुंबई येथे १०० शिव वडा स्टोल उपलब्ध करून देण्यात यावे. त्यासाठी लागणारे भांडवल अण्णा भाऊ साठे आर्थिक महामंडळाकडून देण्यात यावे .
१३]समाजातील बेण्ड पार्टी /वाजंत्री यांना महानगर पालिका /जिल्हा स्तरावर स्टोल [stall ] मोफत देण्यात यावीत .
संदर्भ-मोची समाजाला फुटपथ वरील जागा या प्रमाणे
१४]विविध महामंडळावर /समित्यावर समाजातील व्यक्तीची निउक्ति करण्यात यावी
१५]स्थानीय स्वराज्य संस्थेत मातंग समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावे .
१६]समाजातील शिक्षणाचा स्तर उंचावण्या साठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी -साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे वसतिगृह -मुलांचे आणि मुक्ता साळवे मुलींचे वसतिगृह बांधुन मिळावे .
१७]लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नावाने आवास योजना लागू करावी . 
संदर्भ-राजीव गांधी आवास /वाल्मिकी -आंबेडकर आवास
१८]लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ -भाग भांडवल काही प्रमाणात समाजा मधून उभे करावे. मुख्य समितीवर जिल्हाप्रती निधीत्व देऊन जेने करून महामंडळ कर्ज परत फेडीवर नियंत्रण राहील .
संदर्भ-विविध समाज कल्याण योजना -सामिती
१९]समाजातील ज्या कचरा वेचणाऱ्या असंघटीत महिला आहेत त्यांना महानगर पालिके अंतर्गत कचरा ठेवण्यासाठी जागेची उपलब्ध ता करुन ध्यावी. जेणे करुन वेचलेला कचरा चोरून नेण्याला प्रतिबंध होईल. महानगर पालिके कडून ओळख पत्र देण्यात यावीत .
२०]समाजातील पदवीधर मुलांसाठी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळावे
२१] समाजातील अल्पशिक्षित मुलांसाठी तांत्रिक शिक्षणासाठी अनुदान देण्यात यावे
२२] समाजातील व्यक्तीने बनवलेले उत्पादन उदा. टोपलीसुपेझाडूदोर्खंडेखुर्च्या ह्यास शासनाने बाजारपेठ मिळवून द्यावी
संदर्भ-शेतकर्याने पिकवलेले धान्य/भाजीपाला- कृषी उत्पादन बाजार समिति.
२३] मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे
संदर्भ- संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महत्वपूर्ण योगदान .
२४] गायरान जमिनी मातंग समाजातील व्यक्तीच्या  नावावर करण्यात याव्यात. 
२५] लहूजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशीची अमलबजावणी  शासनाने काटेकोरपणे करून दरवर्षी कार्याचा अहवाल सादर करावा
२६) जातीच्या दाखल्यासाठी लागणारा १९५० सालचा पुरावा शिथिल करण्यात यावा
संदर्भ- ग्रामपंचायत सदस्यमहासभेत निर्णय घेवून अहवाल ग्राह्य धरण्यात यावा

No comments:

Post a Comment